
पुणे : प्रतिनिधी
राज्यात सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली गेली होती ते अभियान पूवर्वत सुरु करा या आशयाचे निवेदन नुकेतच परीट(धोबी) संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक चेतन शिंदे यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, अवर सचिव प्रमोद कानडे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जागतिक महामारीच्या काळामध्ये स्वच्छतेला किती महत्व आहे हे आज सांगण्याचे कारण नाही, या प्रकारच्या जागतिक महामारीला आटोक्यात आणण्याचा मुल-मंत्र आपल्या सर्वाचे गुरु व आपले सर्वाचे दैवत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी कितीतरी वर्षा आधी सांगितलेला आहे. उपरोक्त विषयान्वे आम्ही आपणास विनंती करतो कि करोना रोगाचे व इतर रोगाचे गांभिर्य व त्यांचे परिणाम लक्षात घेता संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान किती महत्वाचे आहे हे सांगण्याची गरज नाही.
बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन दिवंगत नेते आर आर आबा पाटील यांचे संकल्पनेने महारष्ट्र शासनाद्वारे २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले, एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकास कामे ही लोकसहभागातून करण्यात आली. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन , मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फुर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला.
गावातील विद्यार्थी असो की अंगणवाडी सेविका-मदतनीस, सरपंच असो की महिला भगिनी, सर्वांनी या योजनेत भरीव योगदान तर दिलेच परंतु गावाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला गती ही दिली. स्वखुषीने स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या या सर्व लोकांनी गावागावात स्वच्छतेची ग्राम-धून निर्माण केली आणि आरोग्यसंपन्न आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सदर योजेद्वारे प्रथम , द्वितीय आणि तृतीय असे खालील पद्धतीने बक्षीस वितरीत करण्यात येत होते .
बक्षीस क्रमांक प्रथम, पंचायत समिती स्तर २५ हजार, जिल्हा स्तर ५ लाख, विभागीय स्तर १० लाख, राज्य स्तर २५लाख, बक्षीस क्रमांक द्वितीय, पंचायत समिती स्तर १५ हजार, जिल्हा स्तर ३ लाख, विभागीय स्तर ८ लाख, राज्य स्तर २०लाख, बक्षीस क्रमांक तृतीय, पंचायत समिती स्तर १०हजार, जिल्हा स्तर २ लाख, विभागीय स्तर ६ लाख, राज्य स्तर १५लाख हि योजना पुर्ववतसुरु करून सदर योजनेला निधी उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे निवेदन चेतन शिंदे यांनी दिले आहे.





















