जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुक सुरु झाली असून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यामांशी संवाद साधला असता त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 2 महिन्यात विधानसभेसाठी उमेदवार नक्की करणार असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका, स्वत: चा आब राखून महायुतीमधील उमेदवारांचा प्रचार करा अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
एका बाजूला कडगुळ आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व त्यामुळे मी आणि पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मोदी यांना पाठिंबा देताना महाराष्ट्रासाठी आमच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्या पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचतीलच, अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली. यामध्ये मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा देणे, महाराष्ट्रातील गड किल्यांचे संवर्धन मादी महत्त्वाचे विषय असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळातील पहिल्या पाच वर्षातील ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्याता देखील मी विरोध केला. मात्र ज्या गोष्टी मला पटल्या, त्याबाबत मी कौतूकही केले होते, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मला भूमिका बदलणे आवश्यक वाटले त्यामुळे मी भूमिका बदलली, असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना देखील मी काही मागितले नव्हते आणि कौतुक करतानाही मागितले नाही. जे मला आवश्यक वाटले ते मी केले, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.