मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात शिंदे – फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १५ ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी एक मोठं गिफ्ट दिल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी याची घोषणा केली.
काय आहे घोषणा
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून केंद्राप्रमाण महागाई भत्ता देण्याची मागणी केली होती. त्यामुळं आता मुख्यंत्र्यांनी ३ टक्के महागाई भत्ता वाढवला आहे. त्यामुळं आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरुन ३४ टक्क्यांवर गेला आहे.
या महागाई भत्त्याची अंमलबजावणी याच ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. केंद्र सरकारनं १ जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ३ टक्के महागाई भत्त वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांनी देखील ३ टक्के महागाई भत्त्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी आंदोलनंही झाली होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.