जळगाव मिरर / ७ एप्रिल २०२३
जळगाव शहरापासून जवळ असलेले आव्हाणे येथील एका शेतकरीच्या शेतातील मक्याचे कणीस व कडबा जळाल्याने ८० हजारांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी तालुका पोलिसात आगीची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातील रहिवासी रामकृष्ण हरी पाटील (वय ५५) यांच्या आव्हाणे शिवारात गट क्रमांक 179 मध्ये शेत आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास इलेक्ट्रीक तारांमध्ये स्पार्किंग होवून ठिणगी शेतात पडल्याने शेतकर्याच्या शेतातील मक्याचे कणीस व कडबा जळाल्याने ८० हजारांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास हवालदार अनिल मोरे करीत आहे.