
जळगाव मिरर | २९ मे २०२५
येथील मेहरून परिसरातील विचार वारसा फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंगळवार दिनांक 1 जून रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे गुणवंत विद्यार्थ्यांनी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे
दरवर्षीप्रमाणे विचार वारसा फाउंडेशन हे दहावी बारावी व इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करीत असते यंदा देखील रविवार दिनांक 1 जून रोजी संध्याकाळी सात वाजता रामेश्वर कॉलनी परिसरातील मोठे हनुमान मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित तसेच विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवविले जाणार आहे
तरी विद्यार्थ्यांनी त्यांची गुणपत्रिका आणि आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत ही विचारवारचा फाउंडेशन चौकामध्ये प्रकल्प प्रमुख आशिष राजपूत मयूर डांगे यांच्याकडे जमा करावी असे आव्हान अध्यक्ष विशाल देशमुख यांनी केले आहे