
जळगाव मिरर / १७ ऑक्टोबर २०२२
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक भाजपच जिंकणार अशी आम्हाला खात्री होती. त्यानंतरही आम्ही ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आम्हाला काहींनी मागच्या दाराने विनंती केली होती,’ असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. पोटनिवडणुकीतील संभाव्य पराभवामुळेच भाजपने माघार घेतल्याचा दावा करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने जोरदार प्रत्युत्तर मिळाल्याचेही ते यावेळी म्हणाले. ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर माध्यमांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आम्ही पूर्ण निकाल ट्रॅक केला आहे. कुठे कोणते सरपंच निवडणूक आले याचे आम्ही हवेत दावे करीत नाही. आमच्याकडे 889 पैकी 397 ठिकाणी भाजप निवडून आली. तर बाळासाहेबांची शिवसेना 81 ठिकाणी, उद्धव ठाकरेंची शिवसेना 87 ठिकाणी, काँग्रेस 104, राष्ट्रवादी काँग्रेस 98 आणि अपक्ष 95 ठिकाणी आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सर्वांपेक्षा पुढे आहे. आम्ही आधी आणि आताही नंबर वन आहोत.
फडणवीस म्हणाले, निवडणूक लढवावी हे मुंबई युनीटचे मत होते, आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती, आम्हाला राज ठाकरे, शरद पवार यांनी विनंती केली. काही लोकांनी समोरून तर काहींनी मागून केली. राजकारणात मागून कुणी केली हे सांगायचे नसते. चर्चेनंतर आम्ही निर्णय घेतला होता. हा पहिल्यांदा घेतलेला निर्णय नाही. फडणवीस म्हणाले, काही लोक छोट्या मनाची असतात, त्यांना उत्तर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या उत्तराने दिले. आमचे कार्यकर्ते नाराज झाले हे खरे होते. आज मुख्यमंत्र्यांच्या नैतृत्वात रोड सेफ्टीबाबत बैठक झाली. ब्लॅक स्पाॅटबाबत, अपघात घडू नये यासाठी नियोजन आणि उपाय करण्याचा विचार झाला आहे. दरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून उमेदवार मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर भाजपाने आपला उमेदवार माघार घेत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित होते.
अंधेरी पूर्व निवडणुकीत माघार घ्यावी, आणि ती बिनविरोध करावी अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली, तसेच अशीच मागणी शरद पवार यांनी केली असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया आधीच दिली की, मी भाजपला मागणी कशी काय करू शकतो, मी फक्त सूचना केली, अशी स्पष्टोक्ती त्यांनी एका वाहिनीला बोलताना दिली





















