जळगाव मिरर विशेष
जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांचे दिग्गज मंत्री म्हणून गिरीश महाजन आणि गुलबराव पाटील या दोघांना ओळखले जाते. आता राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची मंत्रीपदी निवड झाल्याने जिल्ह्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे.
जळगाव शहरात सध्या अनेक रस्ते खड्डेमय झाले असून काही ठिकाणी काम जरी सुरु असले तरी त्याचे नियोजन पाहीजे तसे झालेले दिसत नाही. ते जे रस्ते राहिले आहे त्याबाबत मोठा प्रश्न जळगावकरांमधून विचारला जात आहे. कारण जळगाव शहराच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असल्याने रस्त्यांच्या विषयांवर गेल्या अनेक महिन्यांपासून जळगावकरांची ओरड पाहायला मिळत होती. काही ठिकाणी रस्त्यांची एकमेव पावसाळ्याआधी पूर्ण झाली. मात्र आगामी काळात जळगाव शहराचे रस्ते संपूर्ण काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात नुकतीच केली, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये जळगावच्या रस्त्यांचा चेहरा-मोहरा बदतेल अशा आशा जनतेच्या उंचावल्या आहेत . तसेच जळगावला विभागीय आयुक्त कार्यालय , केली विकास महामंडळासाठी 100 कोटींचा निधी अशा महत्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या होत्या.
तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पाना गती मिळाल्याचे सांगून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आता नुकताच राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार यांनी थेट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने भाजप शिंदे आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमुळे सरकार आणखी मजबूत झाल्याची जनमानसात भावना आहे. एकीकडे अनेक तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटविण्याची क्षमता असणारे पाडळसरे धरण अनेक कारणांमुळे रखडलेले असल्याने त्याचा मोठा प्रश्न अमळनेर तालुकावासीयांना पडला आहे. मात्र अमळनेरच्या इतिहासात एकमेव आमदार थेट कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेले अनिल भाईदास पाटील यांच्या रूपाने तिसरा बलाढ्य मंत्री जिल्ह्याला मिळाला आहे . अनिल पाटील हे अमळनेर तालुक्याचे आमदार असल्याने ते आता मंत्री झाल्याने पाडळसरे धरणाचे काम प्राधांन्याने पूर्ण करून अमळनेरकरांची तहान भागवतील अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे. तीन विविध पक्षांच्या मंत्र्यांमुळे जळगाव जिल्ह्याचा रखडलेला विकास आणि आगामी काळात होणारे प्रकल्प वेगाने पूर्ण होतील याची जिल्हावासियांना खात्री वाटत आहे. एवढे मात्र निश्चित … !
