
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेरचे ग्रामदैवत संत सद्गुरू सखाराम महाराज संस्थान अमळनेरकर महाराजांची पंढरपूर ते अमळनेर या परतीच्या वारीचे सोमवारी रोजी अमळनेर शहरात आगमन झाले.
कार्तिकी पौर्णिमेला निघालेली वारी ४२ दिवसाच्या प्रवासानंतर सोमवारी दुपारी शहराच्या वेशीवर दाखल झाली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गादी पती परम पूज्य संत प्रसाद महाराज यांचे स्वागत भाविकांनी मोठ्या उत्साहात वाजत गाजत केले. महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी झाली होती. पंढरपूर हुन ८ नोव्हेंबरला निघालेली ही वारी भंडी शेगाव, वेळापूर,अकलूज,करून बारामती, जळगाव, मोरगाव, जेजुरी, सासवड, पुणे, लोहगाव, चरोली आळंदी, चाकण, पारगाव, अहमदनगर, राहुरी, बेलापूर, राहता, कोपरगाव, नांदगाव, सायगाव, मेहुनबारे, तामसवाडी, बहादरपूर असा मुक्काम करत वारी अमळनेरमध्ये दाखल होत तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी शहरातील अंबऋषी महाराज टेकडीवर काल्याच्या कीर्तनाने वारीचा समारोप होतो.




















