
जळगाव : प्रतिनिधी
भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय आयोग नाही. मुसलमान आणि खरिस्ती यांना धार्मिक शिक्षण देणान्या शाळांना सरकारी अनुदान, तर हिंदूंना भगवलीसह धार्मिक शिक्षण देण्यावरच आक्षेप आहे देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, म बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूच्या हजारो युवतींना उद्धवस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट “हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 25 डिसेंबर या दिवशी सायंकाळी 5 वाजता शिवतीर्थ, कोर्ट चौक येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी दिली. समेनिमित्त शहरात पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेस ते संबोधित करत होते. त्यांच्या सह हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी, योग वेदांत समितीचे श्री. अनिल चौधरी आणि व्यावसायिक श्री. विनोद तुळे आदी उपस्थित होते. या सभेत प्रमुख वक्ता म्हणून सुदर्शन चैनल चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे, तसेच सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र- छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, रणरागिणी कु. रागेश्री देशपांडे हे ही सभेला संबोधित करतील, अशी माहिती प्रशांत जुवेकर यांनी दिली.
या सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या संदर्भात माहिती देणारे फलक, क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, काश्मिरी हिंदूंबर झालेल्या अत्याचारांचे फलक यांसह हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच हिंदु जागृती करणाऱ्या ग्रंथांचे, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देणाऱ्या विविध ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.
सभेसाठी १५० हुन अधिक गावात व्यापक प्रसार ! – मोहन तिवारी, हिंदू राष्ट्र सेना
सभेसाठी १५० हून अधिक गावांमध्ये प्रसार करण्यात आला असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, होर्डिंग, फलकलेखन, रिक्शा, उद्घोषणा, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत. विशेष म्हणजे शहरातील बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियनने सभेच्या दिवशी सायंकाळी ज्या महिलांना सभेला यायचे असेल त्यांच्यासाठी सभेला मोफत पोचवून देण्याची व्यवस्था उत्स्फूर्तपणे केली आहे.
२३ डिसेंबर ला शहरात भव्य वाहन फेरीचे आयोजन !
सभेचा व्यापक प्रसार होण्याच्या दृष्टीने शहरात २३ डिसेंबर या दिवशी वाहन (दुचाकी) फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरू पुतळा येथून सकाळी १० वाजता फेरीला सुरुवात होईल आणि चित्रा चौक, शिवतीर्थ, जिल्हाधिकारी कार्यालय, अशी जाऊन पुन्हा शिवतीर्थ येथे समारोप होईल.




















