
जळगाव मिरर | १८ मे २०२३
राज्यात अनेक जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून फसवणूकीच्या घटना उघडकीस येत आहे. अशीच एक घटना मुंबईमधील डोबिवलीमध्ये उघडकीस आली आहे.
सोशल मीडियाच्या जगात वावरत असताना अनोळखी व्यक्ती देखील ओळखीची होते. त्यांच्यात मैत्री होत लग्नापर्यत हि बाब जात असते. त्यातून अनेकांची फसवणूक झालेली आहे. त्यापैकी काही नात्यामध्ये फसवणूकीच प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे. याबाबत तपास करून पोलिसांनी संबंधित युवकाची चांगलीच वरात काढली आहे.
दरम्यान, या प्रकारणात नवरदेवाचे एका मुलींशी लग्न ठरलं होत तर त्याने दुसरीशी देखील साखरपुडा केला असल्याची माहिती समोर आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या आई- वडीलांना ताब्यात घेतल आहे. तर नवरदेवाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.






















