जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२३
देशातील अनेक शेतकरी शेती सोबत शेती सोबत शेळीपालन, मेंढी पालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय करत असतात यातून मोठा त्यांना आर्थिक फायदा देखील होत असतो. आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्ही देखील ही शेती पूरक व्यवसाय करू शकता यासाठी सरकार तुम्हाला मदत करत आहे.
तुम्हालाही व्यवसाय करायची इच्छा असेल मात्र तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्हाला सरकार यासाठी मदत करणार आहे. या मदतीचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. शेतीपूरक व्यवसायासाठी सरकार अनुदान देत आहे. सरकारने यासाठी एक योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण अभियान असे या योजनेचे नाव आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालन, शेळीपालन, पशुखाद्य, मेंढीपालन, वैरण, बियाणे त्याचबरोबर मुरघास निर्मिती यांसारखा व्यवसाय करण्यासाठी कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान सरकार देत आहे. याच्या माध्यमातून शेतकरी एक उद्योजक बनू शकतील. माहितीनुसार, केंद्र सरकारने 12 व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित केल्या असून त्यानुसार सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केले आहे. कोणतीही योजना म्हटलं की त्यासाठी पात्रताही असतेच. तसेच या योजनेसाठी देखील पात्रता आहे. सहकारी दूध उत्पादक संस्था, व्यक्तिगत व्यावसायिक शेतकरी, उत्पादक संस्था, स्वयंसहायता बचत गट, खाजगी संस्था, शेतकरी सहकारी संस्था, आणि स्टार्टअप ग्रुप यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
तुम्हाला जर या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही https://www.nlm.udyamimitra.in या संकेतस्थळावर भेट देऊन त्या ठिकाणाहून ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. यामध्ये पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, प्रकल्प अहवाल, वीज बिलाची प्रत अशा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला अनुदान मिळून जाईल.
