जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२३
रक्षाबंधनचा पवित्र सण अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपला असतांना राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्या चुलत भाऊ – बहिणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना हिंगोलीच्या आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील डोंगरकडा गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या बाळापुर हद्दीत असलेल्या डोंगरकडा या गावातील आनंदा पंडित (वय २८) व ऐश्वर्या पंडित (वय १८) या दोघी चुलत बहीण भावांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याले आहे. डोंगरकडा गावातील एकाच गल्लीमध्ये ऐश्वर्या व आनंद हे दोघेही नात्याने सख्खे चुलत बहीण भाऊ राहायचे. सोमवारी सायंकाळी स्वतःच्या घरात बहिणीने तर रात्री भावाने शेतामधील झाडाला गळफास घेत जीवन संपवले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह आखाडा बाळापूर येथील शवविच्छेदन कक्षात दाखल करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाळापुर परिसरासह पंडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र या दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत बाळापुर पोलिसांनी कोणतीही माहिती अद्यापपर्यंत दिलेली नाही. या घटनेचा बाळापूर पोलीस तपास करत असून पोलिसांच्या चौकशीनंतर या दोघांच्याही आत्महत्येचे कारण पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.