
जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२३
राज्यासह जिल्ह्यात प्रथमच एका ५० वर्षीय महिलेला एमपीडीए कायद्यांतर्गत रामानंद नगर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत हरिविठ्ठल नगरातील रेल्वे पुलाजवळ धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (वय ५०) हि महिला या परिसरात दारू विकून हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर तसेच आजुबाजूच्या परिसरातील तरुण मुले, व्यक्ती दारूच्या आहारी जावुन व्यसनाधीन झालेले आहेत. तसेच व्यसनी व्यक्तीमुळे तरुण पिढीचे कुटुंबे व्यसनाधीन होवुन कुटुंबातील मुली, स्त्रियांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच व्यसनी इसमांमुळे रामानंद नगर पोलीस स्टेशन परिसरातील तसेच जळगांव शहरातील स्त्रिया, मुलींचेचे छेडखानीचे प्रमाण वाढले होते.
या महिलेवर आज पर्यत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे १६ गुन्हे दाखल असुन तिचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ९३ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा तिला कायद्याचा धाक राहिलेला नव्हता. यामुळे धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (वय ५०) हीचेवर कायद्याचा धाक रहावा व भीती राहावी या करिता रामानंद पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील यांनी चार्ज घेतल्या पासुन अवघ्या ०४ महिन्यातच जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शन व मदत घेऊन सुमारे ०८ ते १० वर्षा पासुन रामानंद नगर पो.स्टे. हद्दीत गावठी हात भट्टीची दारू विक्री करणारी महिला नामे धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर हिस एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत मध्यवर्ती कारागृह अकोला जिल्हा अकोला येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. सदरची स्थानबद्ध करण्यात आलेली महिला हि जळगाव जिल्हा तसेच महाराष्ट्रातुन पहिलीच महिला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील, पो.हे.कॉ. संजय सपकाळे, पो.हे.कॉ.सुशील चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ.सुनील दामोदरे, पो.हे.कॉ.राजेश चव्हाण, पो.हे.कॉ.विजय खैरे, पो.ना.रेवानंद साळुंखे, पो.ना. विनोद सुर्यवंशी, पो.कॉ.रवींद्र चौधरी, पो.कॉ.उमेश पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो. कॉ. ईश्वर पाटील, पो.कॉ. इरफान मलिक व महिला पोलीस राजश्री पवार या सर्वांनी सदर स्थानबद्ध करण्यात आलेल्या महिले विरुद्ध दाखल गुन्ह्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन तिला स्थानबद्ध करणे बाबत महत्वाची भुमिका पार पाडली आहे.





















