जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५
पती- पत्नी हे नाते खूप प्रेमाचे व विश्वासाचे मानले जात असते. मात्र अनेकदा याच नात्यात संशय व छोट्या मोठ्या कारणाने वाद होण्याची चिन्हे मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतु किरकोळ कारणावरुन पत्नीचा खून करणारा पती असू शकतो का? पत्नी जास्त बोलते म्हणून त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कराड तालुक्यातील विंग येथे बायको जास्त बोलत असल्याने नवऱ्याने गळा दाबून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मयुरी कणसे असे (वय 27) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पत्नीचा खून करणाऱ्या पती मयूर यशवंत कणसे याला कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात विशाल सदाशिव कणसे याने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मयूर कणसे याचे मयुरी यांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. लग्नाच्या वर्षभरात त्यांचामध्ये वाद सुरु झाला. मयुरी हिचे मयूर याच्या कुटुंबातील लोकसोबत जमत नव्हते. त्यांच्याशी तिचे भांडण होत होते. त्यामुळे ती नवऱ्याला सोडून माहेरु निघून गेली.
मयूर याने मयुरीची समजूत घालत चार महिन्यापूर्वी तिला घेऊन आला. दोन्ही नवरा-बायको येथे भाड्याच्या घरात राहू लागले. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु होता. बुधवारी मध्यरात्रीही त्यांच्यात वाद झाला. त्या वादात मयूर याने मयुरीला रागात मारले. त्यानंतर तिचा गळा आवळला. त्यामुळे मयुरीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मयूरने मयुरी जास्त बोलते म्हणून तिची हत्या केल्याचे विशाल कणसे यांना सांगितली. त्यानंतर विशालने पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान, मयुरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. कराड तालुका पोलीस पुढील तपास करत आहे