जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महामार्गावर नेहमीच अपघाताची मालिका सुरु असतांना नवीन वर्षाच्या सुरुवातीळा मुंबईतून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जो अपघात मुंबईतील सर्वात रहदारीचा परिसर असलेल्या धारावी- माहीस येथील जंक्शनजवळ घडलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अपघाताची घटनाही शुक्रवार पहाटेच्या सुमारास घडली आहे. घडलेल्या अपघातात एका मोठ्या ट्रेलरने तब्ब्ल पाच ते सहा वाहनांना धडक दिली आहे. दिलेली धडक इतकी जोरदार होती की गाड्या मिठी नदीच्या खाडीत पडल्या आहेत ,मात्र या कोणतीही जीवित हानी झालेली नाही. शुक्रवारी घडलेला अपघात ट्रेलर चालकाचा डोळा लागला होता, असा अंदाज सांगण्यात येत आहे.
