जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२५
गेल्या काही महिन्यापासून जळगाव शहरातील अनेक भागात वाळूच्या वाहतुकीने काहींचा जीव गेला तर काहीना गंभीर केल्याच्या घटना ताज्या असतांना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी काढलेल्या आदेशानंतर जळगाव शहरात कुणालाही वाळू मिळत नव्हती मात्र आता कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे दोन दिवसापूर्वी रजेवर जाताच जळगाव शहरात वाळू चोरट्यांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे तर महसूल प्रशासन झोपण्याचे सोंग घेत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव शहरात गेल्या दोन महिन्यात अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात झाले आहे. यात नेहमीच सर्वसामान्य जनतेचा जीव गेला तर काही ठिकाणी झालेल्या अपघातात कायमचे अपंगत्व देखील आलेले आहे. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळू चोरट्याविरोधात मोठी मोहीम उभी केली होती. त्यानंतर शहरात कुणालाही वाळू मिळत नसल्याने अनेक कामे थांबून गेले होते. आता मात्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दोन दिवसापूर्वी रजेवर जाताच शहरातील अनेक मध्यवर्ती ठिकाणी वाळूचे भलेमोठे ढीग दिसून येत आहे. त्यामुळे जळगाव शहरातील महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यानी झोपेचे सोंग घेतले कि झोपले आहे. यावर आता जळगाव शहरात चर्चा सुरु झाली आहे.
