जळगाव मिरर | २७ मार्च २०२५
घरी कोणीही नसताना मुकेश अर्जुन पाटील (३५, रा. चंदूअण्णा नगर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ मार्च रोजी, दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संगणक केंद्राचा व्यवसाय करणारे मुकेश पाटील हे बुधवारी (२६ मार्च) दुपारी घरी एकटेच होते.
त्यावेळी त्यांनी गळफास घेतला. कुटुंबीय घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. मुकेश यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांनी मयत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी गेल्या काही दिवसांपासून मुकेश हे आर्थिक विवंचनेत होते. त्याकरिता काही नातेवाईक त्यांची समजूत देखील काढत होते, अशी माहिती कुटुंबीयांकडून मिळाली. दरम्यान, मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.