
जळगाव मिरर | ३० एप्रिल २०२५
देशातील कोलकातामधील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे . या भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. असल्याचे म्हटले जात आहे. काल रात्री कोलकात्यातील बारा बाजार परिसरातील मच्छुआ फल मंडीजवळील ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणण्यात आली. कोलकाता पोलिस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी आगीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता पोलिस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी आगीच्या घटनेबद्दल माहिती दिली. त्यांनी याविषयी माहिती देताना, “मंगळवारी रात्री ८:१५ च्या सुमारास आगीची घटना घडली. आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि अनेक लोकांना पथकांनी वाचवले आहे. ” असे त्यांनी सांगितले. आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि बचाव कार्य सुरू आहे. आग कशी लागली याचा अधिक तपास सुरू आहे. तपासासाठी एक विशेष पथकही तयार करण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष शुभंकर सरकार म्हणाले, “ही एक दुःखद घटना आहे. सरकारकडून कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. सरकार काय करत आहे हे मला माहिती नाही.” कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम हे देखील अपघातस्थळी पोहोचले आहेत.
आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कोलकाता हॉटेलमध्ये लागलेली आग इतकी भीषण होती की, जीव वाचवण्यासाठी लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या. तथापि, या काळात अग्निशमन दलाच्या पथकानेही महत्त्वाची भूमिका बजावली. तो घटनास्थळी पोहोचला आणि अनेक लोकांना वाचवले.





















