
जळगाव मिरर | ३ जून २०२५
गेल्या काही वर्षापासून भाजपचे आमदार टी राजा सिंह हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. त्यांनी यावेळी बकरी ईदच्या आधी त्यांना अनेक अनोळखी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा केला आहे. याविषयी त्यांनी “फोन करणारे म्हणत आहेत की “आम्ही यावेळीही गायींची कत्तल करू आणि मोदी-योगी काहीही करू शकणार नाहीत. येणाऱ्या काळात आम्ही तुमचीही कत्तल करू.”अशा थेट धमक्या आपल्याला मिळत असल्याचे म्हटले आहे.
टी राजा यांनी या धमक्यांवर प्रश्न उपस्थित करताना यांनी, “बकरी ईद ७ जून रोजी आहे, आम्हाला या सणाशी काहीही अडचण नाही. प्रत्येक धर्माला हा सण साजरा करण्याचा अधिकार आहे. पण जर कोणी गौमाता, तिच्या मुलांना आणि नंदीची कत्तल करण्याचा कट रचला तर आम्ही त्याचा विरोध करू.” असे त्यांनी म्हटले. तसेच ते म्हणाले की धमक्या देणाऱ्यांची टोळी प्रत्येक वेळी सक्रिय होते, परंतु ते शांत बसणार नाहीत.” असेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.
टी राजा सिंह म्हणाले की त्यांनी या धमकीबद्दल पोलिसांकडे तक्रार केली आहे, परंतु कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. ते म्हणाले, “जेव्हा जेव्हा आपण गायींच्या रक्षणाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला धमक्या दिल्या जातात. पोलिसांना सर्व माहिती देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही.”
राजा सिंह यांनी धमकी देणाऱ्यांना थेट इशारा दिला. ते म्हणाले, “तुम्ही लोक चुकीच्या व्यक्तीला धमकावत आहात. आम्हाला भीती वाटत नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या. आम्ही हिंदू तुम्हाला तुमची जागा दाखवू. आम्हाला कोणाचीही भीती वाटत नाही.”
बकरीदच्या आधी, टी राजा सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि हैदराबाद पोलिस आयुक्तांना इशारा देत गोहत्येचे गंभीर परिणाम उद्धृत केले आणि धार्मिक संदर्भात तीव्र आक्षेप व्यक्त केला. त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की सरकार गायी आणि इतर गुरांची बेकायदेशीर वाहतूक आणि बलिदानाला प्रोत्साहन देत आहे.
ते म्हणाले की सरकारी चेकपोस्टवर बनावट पशुवैद्यकीय प्रमाणपत्रे (डुप्लिकेट प्रमाणपत्रे) बनवली जात आहेत, जेणेकरून गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक कायदेशीर असल्याचे दाखवता येईल. त्यांनी याला धार्मिक भावनांची थट्टा म्हटले आणि सरकार या संपूर्ण कृतीला शांतपणे पाठिंबा देत असल्याचे म्हटले.
टी राजा सिंह यांनी पुन्हा सांगितले की बकरी ईद साजरी करण्यास कोणताही आक्षेप नाही, परंतु ते नेहमीच गोहत्येला विरोध करतील. ते म्हणतात की गाय आपल्यासाठी आईसारखी आहे आणि तिचे रक्षण करणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. भाजप आमदाराने स्पष्टपणे म्हटले आहे की जर सरकारने वेळीच यावर कठोर कारवाई केली नाही तर त्याचे गंभीर धार्मिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतात.





















