जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२५
दुचाकीवरुन जातांना मुलीकडे पाहून भुंकण्याच्या कारणावरून दोन गटात दोन दिवसांपासून वाद सुरु होता. रविवारी दुपारच्या सुमारास हा वाद पुन्हा उफळून आल्याने त्यांच्यामध्ये पुन्हा हाणामारी झाली. यामध्ये एकनाथ निंबा महाजन (गोपाळ) (वय ५५, रा. बिलवाडी, ता. जळगाव) यांना जबर मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दोन्ही गटातील सुमारे १२ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बिलवाडी येथे घडली असून याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांचे सासरे रामदास गोपाळ हे वावडदा येथून बिलवाडी येथे येत असतांना ते रस्त्यावर थुंकले होते. त्यावरुन गावातील पाटील कुटुंबातील एकाने त्यांच्यासोबत माझ्यासोबत असलेल्या मुलीला बघून तुम्ही थुकले या कारणावरुन वाद घातला. रात्रीच्या सुमारास दोन्ही गटाने एकमेकांना बोलून हा वाद मिटवला होता. रविवारी दुपारच्या सुमारास एकनाथ महाजन हे बकऱ्या चारून घरी येत असताना पाटील कुटुंबातील एकाने पुन्हा त्यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्यातील वाद वाढत जाऊन दोन्ही कुटुंब एकमेकांना भिडले. त्यांच्याकडून बांधकाम साहित्य, पावडी, लाकडी दांड्याचा वापर करीत एकमेकांना मारहाण करीत करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत एकनाथ महाजन यांना जबर मार लागून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
या हाणामारीच्या घटनेत दोन्ही कुटुंबांमधील १२ जण जखमी झाले. असून त्यामध्ये किरण देविदास पाटील (वय २८), मीराबाई सुभाष पाटील (वय ४८), ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (वय ४०), दीपक ज्ञानेश्वर पाटील (वय २३), संगीता रोहिदास पाटील (वय ४०), कमलेश प्रमोद पाटील (वय २६), जनाबाई एकनाथ गोपाळ (वय ५५), ज्ञानेश्वर एकनाथ गोपाळ (वय ३५), समाधान हिलाल गोपाळ (वय ३५), गणेश एकनाथ गोपाळ (वय २७), गौरव अर्जुन गोपाळ (वय ३१), भीमराव एकनाथ गोपाळ यांचा समावेश आहे.