
जळगाव मिरर | २२ मार्च २०२६
भुसावळ तालुक्यात प्रेमविवाहाच्या वादातून घडलेली ही घटना गंभीरतेसह समोर आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
माहितीनुसार, एका गावातील तरुण-तरुणीने १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर १९ मार्च रोजी दोघांनी भुसावळ पोलिस ठाण्यात विवाहाची माहिती दिली आणि तरुणाचा मामाच्या घरी मुक्कामी गेले. २० मार्च रोजी तरुणीचे नातेवाइक व इतर १०-१२ जण त्याच्याच्या मामाच्या घरी गेले आणि तरुणीला मारहाण करून पळवून नेले. यानंतर संशयितांनी तरुणाला खांबाला बांधून नग्न केले आणि लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण केली. त्यानंतर दुचाकीने त्याला त्यांच्या गावातील घरापर्यंत घेऊन जाऊन मारहाण केली, तसेच त्याच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिली.
जखमी अवस्थेत तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले, जिथे डॉक्टरांनी त्याचा हात फॅक्चर झाल्याचे सांगितले. घटना उघडकीस आल्यावर अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते तसेच विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.




















