
जळगाव मिरर | २७ मार्च २०२६
खानदेशातील पर्यटनाला नवे बळ देणारा ‘नंदग्राम गोधाम’ अॅग्री टुरिझम व वॉटर पार्क पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे. “खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क” असा दावा करत या प्रकल्पात कुटुंबासह एकाच ठिकाणी मनोरंजन, निसर्ग आणि ग्रामीण संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवता येत आहे.
या वॉटर पार्कमध्ये केवळ जलक्रीडा नव्हे, तर विविध आकर्षक उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. तिकीटामध्ये वेलकम ड्रिंक, पॉपकॉर्न आणि कॉटन कँडी यांचा समावेश असून, पीक सिटी (फोटो पार्क), गो-तीर्थ (म्युझियम), ‘आपले गाव’ संकल्पना, बोटिंग, शौर्यवन, बालवन (किड्स पार्क), सेल्फी पार्क आणि स्विमिंग पूल यांसारख्या सुविधा पर्यटकांना उपलब्ध आहेत.
या सर्व सुविधांसाठी प्रति व्यक्ती ५०० रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला असून, ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश दिला जात आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पर्यटकांना या ठिकाणाचा आनंद घेता येतो.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे येथे उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण वातावरणात आधुनिक सुविधांचा संगम साधत कुटुंबांसाठी एक परिपूर्ण ‘डे-आऊट डेस्टिनेशन’ म्हणून ‘नंदग्राम गोधाम’ वेगाने लोकप्रिय होत आहे.
पर्यटकांसाठी जेवण आणि स्विमिंग कॉस्च्युमसारख्या सुविधा अतिरिक्त दरात उपलब्ध असून, स्वतःचे जेवण (फक्त फळे) आणण्यासही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत एक दिवस आनंदात घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय ठरत आहे. एकंदरीतच, खानदेशातील पर्यटन नकाशावर ‘नंदग्राम गोधाम’ हे नवे आकर्षण ठरत असून, येत्या काळात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















