
जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६
शहरातील JAISHNU PACE IIT & Medical Gurukul या संस्थेला विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून संस्थेची ओळख अधिक बळकट होत आहे.
संस्थेत ९ एप्रिलपासून नवीन बॅच यशस्वीरित्या सुरू करण्यात आली आहे. वाढत्या प्रतिसादामुळे आता आणखी एक नवीन बॅच १९ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. या बॅचमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी (फाउंडेशन) तसेच इयत्ता ११ वी (JEE / NEET / MHT-CET) साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था मोठी संधी ठरत आहे. उच्च शिक्षणासाठी इतर शहरांकडे जाण्याची गरज आता उरलेली नसून, जळगावमध्येच IIT, JEE Main, NEET, MHT-CET तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे.
संस्थेमध्ये अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकवर्ग, नियमित टेस्ट सिरीज (मेजर टेस्ट / TWT), प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष आणि स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन अशा सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
संस्थेच्या संचालकांनी सांगितले की, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देऊन त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
मर्यादित जागा असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“JAISHNU PACE – तुमच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करणारे नाव!”





















