. या घटनेनंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झालं .
जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२६

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे.
घटणस्थळांवरून मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे येथे १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना जुन्या बिलांच्या कारणावरून ग्रामसेवक प्रल्हाद पाटील आणि काही ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेला हा वाद काही वेळातच तीव्र झाला. संबंधित ग्रामस्थांनी पाटील यांच्याशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केल्याचे तसेच त्यानंतर त्यांच्यावर मारहाण केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक कारवाईत समोर आले आहे.
जुन्या बिलांवरुन सुरु झालेला वाद वाढत गेल्याने परिस्थिती गंभीर बनली. यावेळी सात जणांनी एकत्रितपणे ग्रामसेवक पाटील यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीत घाबरलेल्या पाटील यांनी तेथून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या धावपळीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर शिवरे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासानंतर सात संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये गुन्हा क्रमांक ३१५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी या प्रकरणातील एका मुख्य संशयिताला अटक केली आहे. उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे. घटनेमागील नेमका वाद, मारहाणीमध्ये कोणाची काय भूमिका होती, तसेच मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. ग्रामसेवक प्रल्हाद पाटील हे शासकीय कर्तव्य बजावत असताना ही घटना घडल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. ग्रामसभा ही गावातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनाशी संवाद साधण्यासाठीची महत्त्वाची लोकशाही प्रक्रिया आहे. अशा बैठकीदरम्यान एखाद्या प्रशासकीय विषयावरून वाद निर्माण होऊन तो थेट हिंसक प्रकारापर्यंत पोहोचणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
पारोळा येथे धुळे रोड अमरधाम त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.
पारोळा पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून घटनेतील सर्व आरोपींची भूमिका तपासली जात आहे. उपलब्ध पुरावे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि घटनाक्रमाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताकडूनही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. उर्वरित संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसां





















