जळगाव मिरर | दि.२५ डिसेंबर २०२३
मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पल्लवी योगेश पाटील (वय ३५, रा. वाघनगर) विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, विवाहितेच्या सासरच्यांनी विवाहितेसोबत घातपात केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाघ नगरात पल्लवी पाटील या वास्तव्यास होत्या. त्यांचे मध्यप्रदेश मधील लोणी बहादरपूर येथील माहेर आहे. त्यांचे पती जिल्हा परिषदमध्ये कंत्राटीपद्धतीने अभियंता म्हणून नोकरीस असून त्यांना दोन मुली आहेत. विवाहितेला मुलगा होत नसल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात होता. त्यामुळे कोरोना काळात विवाहिता या दहा महिने माहेरीच होत्या. मात्र त्यानंतर त्या पुन्हा लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती • लागलीच रामानंद नगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यानंतर संजय आफ्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.