
जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६
जळगाव शहरातील प्रभाग क्र. ९ च्या नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या उद्देशाने कामांचा शुभारंभ सुरु केला आहे. आज त्यांनी देवराम नगर परिसरातील मुख्य गटारीची पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
प्रभागातील अनेक गटारी तुंबल्या असल्यामुळे नागरिकांना घरात आणि रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. नगरसेविकेच्या निर्देशानुसार मनपा आरोग्य विभागाने ताबडतोब जेसीबीद्वारे गटारी साफ करण्याचे काम सुरू केले. जयश्री पाटील यांनी या दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकल्या आणि आगामी दिवसांत प्रभागातील सर्व तुंबलेल्या गटारी लवकरात लवकर स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, प्रभागातील स्वच्छता आणि पाणी निचरा यासाठी नियमित पाहणी आणि तातडीच्या कारवाईवर भर दिला जाईल. या उपक्रमामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाची लहर पसरली असून, नवनिर्वाचित नगरसेविकेच्या कार्यप्रवणतेचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे.




















