जळगाव मिरर । २१ जुलै २०२३
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील अनेक नागरीसमस्ये बाबत धर्मरथ फाऊंडेशनच्या माध्यमातून जळगाव महानगर पालिकेच्या उपायुक्तांना निवेदन देऊन परिसरातील समस्या मांडून त्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या अशी आग्रहाची मागणी देखील करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे कि, छत्रपती शिवाजीनगर परिसरातील बारसे कॉलनी समशानभूमी, दफनभूमी व रेल्वे मार्ग यांनी मिळलेला परिसरातील कॉलोनीची प्रवेशद्वारापासूनच अतिशय खराब स्थितत असलेले रस्ते व तुंबलेल्या गटारी असून त्यांची घाण पाणी रस्त्यावर पूर्ण कॉलनी परिसरात आहे. तसेच पक्के रस्ते नसल्यामुळे गटारीच्या पाणी रस्त्यावरून चिखल आणि घाण पाण्याच्या ठीक ठीकानी डबके साचत आहे प्रचंड दुर्गंधी व पाण्याचे साम्राज्य बसत आहे त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झालेला आहे त्या पावसाळ्यात असलेल्या भर पडली आहे याबाबत मागणी एक दोन वर्षांपूर्वी देखील केली होती.. परंतु या ठिकाणी कोणीही लक्ष देत नाहीये त्यामुळे आम्ही निवेदन उप-आयुक्तांना देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित दिलीप कोष्टी,किरण जाधव, अकिल पटेल, धर्मरथ फाऊंडेशन अध्यक्ष विनायक पाटील,चंद्रकांत शेलके , ललित लोहार , चंद्रकांत देवरे , कृष्णा कोष्टी , दीपक पाटिल , निलेश पाटिल