जळगाव मिरर । ७ जुलै २०२३
जळगाव शहरातील एका परिसरात १५ वर्षीय मुलीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळाहुन पोलिसांना सुसाईट आढळून आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शास्त्रीनगरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरात शिक्षणासाठी जळगावातील काका-काकूंकडे राहणाऱ्या धरणगावच्या दहावीच्या विद्यार्थिनीने बुधवारी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. कृष्णाप्रिया अरुण पाटील (१५) असे मयत मुलीचे नाव असून ‘एकटं एकटं वाटते!, मरावे का? याचे कारण काय मलाच माहीत नाही पण जगून काहीच फायदा नाही,’ असे ‘मरण चिठ्ठी’ नावाच्या दोन पानी सुसाइड नोटमध्ये लिहिलेले पोलिसांना घटनास्थळी आढळले आहे. धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील कृष्णाप्रिया शिक्षणासाठी जळगावला काका-काकूंसोबत मागील वर्षापासून राहत होती. आई-वडील लहान अपंग भाऊ आणि बहिणीसोबत गावी राहतात. शनिवारी ती काका-काकूंसोबत पेरणीसाठी गावी गेली होती. मात्र बुधवारी सकाळी ती एकटीच परत जळगावला आली. त्यानंतर तिने आपले जीवन संपवले. यावेळी घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांनी दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, हर्षल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी घटनस्थळाचा पंचनामा करुन विद्यार्थीनीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.