
जळगाव मिरर | १३ जून २०२५
गेल्या दोन दिवसापूर्वी जळगाव शहरातील वादळी वारा व ४० मिनिट झालेल्या पावसामुळे महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील दुध फेडरेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दि.११ रोजी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वारासह अनेक झाडे कोलमडून पडल्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या होत्या. त्यामुळे शहरातील अनेक परिसरातील वीज बंद झाली होती. यानंतर या उपकेंद्रात मोजून ४ ते ५ कर्मचारी कार्यरत असल्याने बाकीचे कर्मचारी या ठिकाणी आढळून आले नसल्याने जे कर्मचारी उपस्थित होते त्यांनी रात्री २ ते ३ वाजे दरम्यान परिसरात वीज सुरु केली मात्र ती वीज पुन्हा सकाळी गायब झाली या प्रकारे गेल्या दोन दिवसापासून विजेचा लंपडाव या परिसरात सुरु आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी दि.१२ रोजी रात्री उपकेंद्रात येवून जाब विचारला असता. त्यांची लागलीच एक तासात वीज सुरु करण्यात आली होती. या उपकेंद्रात रात्रीच्या वेळी एक सुरक्षारक्षक दारूच्या नशेत असल्याचे देखील काही नागरिकांना आढळून आले होते. मात्र अशा वेळी या उपकेंद्रात प्रमुख अधिकारी नसल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढत होता.
पाच दिवसासाठी महिला अधिकारी !
या उपकेंद्रात चार ते पाच दिवसासाठी एका महिला अधिकारीची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या महिला अधिकारी देखील आज दि.१३ रोजी कार्यालयात येवून माहिती घेतली यावेळी त्यांना विचारले असता ते देखील जबाबदारी झटकून मी केवळ चार पाच दिवसासाठी आहे. त्यामुळे मी जास्तीचे काही करू शकत नाही. असे उत्तर देत असल्याचे दिसून आले.
कायमस्वरूपी कर्मचारी दिसेना !
या कार्यालयात कायमस्वरूपी कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे कर्तव्यावर असून काही कंत्राटी कर्मचारी दिवसरात्री एकत्र करून काम करत आहे. या काही कायमस्वरूपी कर्मचारी इमानदारीने कर्तव्य बजावीत आहे तर काही दिवस भरण्याच्या नादात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा मोठा संताप व्यक्त होत आहे.
उन्हाळ्याचे काम पावसाळ्यात करताय ?
दरवर्षी उन्हाळ्यात विजेच्या डीपीजवळ व वायरला अडचण येणाऱ्या जवळपासचे झाडे तोडण्याचे काम उन्हाळ्यात करावे लागते मात्र या उपकेंद्रात हे झाडे पावसाळा सुरु झाल्यावर करायला सुरुवात केल्याचे देखील या ठिकाणी नागरीकामध्ये चर्चा सुरु होती.