
जळगाव : प्रतिनिधी
स्मशानभूमीत मनपा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अग्निडाग देऊन निघून जाणाऱ्या नागरिकांच्या विश्वासाला तडा जाईल असा प्रकार बुधवारी रात्री शिवाजीनगर स्मशानभूमीत घडला. अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या शिवाजीनगरातील नागरिकांना आेट्यावर रचलेल्या सरणावर प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. पथदिवे बंद असल्याने अंधारात कर्मचारी नसल्यामुळे हा प्रकार घडला असून शिवसैनिकांनी पुन्हा अग्निडाग देऊन माणुसकीचा धर्म पाळला.
काेराेना काळात स्मशानभूमीत अशी स्थिती निर्माण झाली नसेल एवढा वाईट अनुभव बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगरातील स्मशानभूमीत नागरिकांना आला. शिवाजीनगरातील रहिवासी देविदास भंडे यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी नागरिक शिवाजीनगरातील स्मशानभूमीत गेले असता त्या ठिकाणी एका आेट्यावर अर्धवट अवस्थेत प्रेत आढळून आले. स्मशानभूमीतील कर्मचारी त्या ठिकाणी हजर नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आराेप शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय बांदल व भगवान साेनवणे यांनी केला आहे. दरम्यान, स्मशानभूमीत पथदिवे बंद असल्याने अंधार हाेता. त्यामुळे काेणालाही काहीही कळत नव्हते. तसेच महापालिकेचा कर्मचारी देखील गायब हाेता.
कार्यकर्त्यांनीच दिला अग्निडाग
इंद्रप्रस्थनगरातील नागरिकाचे निधन झाल्याने सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रेत अंत्यसंस्कारासाठी आणले हाेते. अग्निडाग देताना मनपा कर्मचाऱ्याकडून पुरेशी व्यवस्था न केल्यामुळे प्रेत अर्धवट जळाल्याचे समाेर आले आहे. देविदास भंडे यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी पुढाकार घेत अर्धवट जळालेल्या प्रेताला पुन्हा अग्निडाग देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. तसेच मनपाच्या काराभारावर नाराजी व्यक्त केली.





















