जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२५
केंद्र सरकारने देशातील पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्यूटीत २ रुपये प्रति लीटर दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ होणार आहे. वाढलेल्या एक्साईज ड्यूटीमुळे तेल कंपन्या या तेलाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या कच्च्या तेलाच्या आंतराष्ट्रीय किंमतीत अस्थिरता कायम आहे. अशात केंद्र सरकारने उचलेले हे पाऊल पाहाता सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार होणार आहे. खासकरुन जे रोज वाहनांनी प्रवास करतात. किंवा वाहतूक क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसणार आहे.
दुसरीकडे ,सरकारचा हा तर्क आहे की या दरवाढीने सरकारच्या तिजोरीत पैसे जमा झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य विकास योजनांत पैसा ओतता येणार आहे. नुकतेच बजेटमध्ये केंद्र सरकारने मोठमोठे प्रकल्प जाहीर केले आहेत.त्यांना या दरवाढीतून पैसा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास त्याचा महागाईवरचा प्रभाव मर्यादित असतो, परंतु जर किंमती वाढल्या तर त्याचा महागाईवरही थेट परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या,या निर्णयाने आता सर्वसामान्य लोकांना इंधन खर्चासाठी काही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
