
जळगाव मिरर | २४ जून २०२४
शहरातील मुख्य बाजार पेठेसह अनेक परिसरात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत असून त्याबाबत अनेक नागरिकांनी नेहमीच तक्रारी दिल्यावर देखील कुठलीही तत्काळ उपाययोजना होत नसल्याने आज दि.२४ रोजी मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी मनपा आयुक्त ढेरे यांना तक्रार दिली आहे.
तक्रारीत म्हटले आहे कि, गेल्या कित्येक दिवसांपासून वृत्तपत्रांमधून शहरातील अनेक समस्यांबाबत बातम्या येत असतात परंतु, त्या समस्यांचे निवारण म.न.पा प्रशासन करतांना दिसत नाही. दिवसेंदिवस समस्या वाढतच आहे. जळगांव शहरात साफ सफाईचा विषय अत्यंत बिकट आहे. गटारी व्यवस्थीत साफ केल्या जात नाही. त्या चोक-अप झाल्या आहेत. त्यातच आता पावसाळा असल्यामुळे पाऊस पडल्यावर त्या गटारी ओव्हरफ्लो होऊन वाहतात. त्यामुळे ते पाणी लोकांच्या घरात शिरते असे होऊ नये म्हणुन गटारी साफ करण्यात याव्या चोक-अप काढण्यात यावे. कचरा वेळेवर उचलला जात नाही. पावसाळा असल्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी येऊन त्यामुळे विविध आजार उद्भवण्याची शक्यता आहे.
तसेच पावसाळयात डेंगुसारखे आजार होऊ नये म्हणुन अॅबेटींग केली जाते परंतु, अजुन पर्यंत अॅबेटींगला सुरवात झालेली नाही. तसेच शहरातील भरपुर ठिकणी पथदिवे बंद आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नागरीकांना अंधाऱ्याचा सामना करावा लागत आहे. ते पथ दिवे त्वरीत सुरू करण्यात यावे तरीही, आपणास विनंती की, सर्व समस्यांचे त्वरीत निराकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी दिला आहे.





















