जळगाव मिरर / ३ एप्रिल २०२३
सध्या देशभरात शहरांची नावे बदलण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरलेल्या उत्तर प्रदेश सरकारने आता अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण आता इतिहासाच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे धाडसी निर्णय घेणारे म्हणून ओळखले जातात.
योगी सरकारने १२वीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. यूपीमध्ये १२वीच्या वर्गासाठी शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास वगळण्यात आला आहे. याशिवाय इयत्ता ११वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींचा संघर्ष आणि औद्योगिक क्रांतीचे धडेही काढून टाकण्यात आले आहेत. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापासूनया निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासोबतच नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व आणि शीतयुद्धाचा धडाही काढून टाकण्यात आला आहे.
तसेच नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व आणि शीतयुद्धाचा धडा काढून टाकण्यात आला आहे. ‘स्वतंत्र भारतातील राजकारण’ या पुस्तकात जनआंदोलनांचा उदय आणि एकपक्षीय वर्चस्वाचा काळ हे विषय काढून टाकण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपली संस्कृत ही आपली सांस्कृतिक वारसा आहे. आपल्या नव्या पिढीला वारसाची ओळख करून द्यायची आहे. जुन्या काळी लोकांना आपल्या संस्कृतीपासून वंचित ठेवले जात होते, लोकांना सांगितले जात नव्हते. आता आम्ही लोकांना खरी संस्कृती सांगू, असे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी सांगितले. दरम्यान, मुघलांचे नाव आणि इतिहासाबाबत योगी सरकारने यापूर्वी सुद्धा धाडसी निर्णय घेतले आहेत. २०२०मध्ये योगी सरकारने आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय केले. त्यानंतर ट्विट करत योगी म्हणाले होते, ‘आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल. तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रतिकांना स्थान नाही. आमचे हिरो शिवाजी महाराज आहेत. जय हिंद जय भारत.’