जळगाव मिरर | ३ जुलै २०२५
कंपनीत काम करतांना कोणत्यातरी विषारी द्रावणाच्या संपर्कात आल्याने विषबाधा होवून विश्वनाथ शांताराम सोनवणे (वय २७, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. १ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कुसुंबा गावात विश्वनाथ सोनवणे (वय २७) हे वास्तव्यास होते. ते एमआयडीसीतील एका कंपनीत काम करीत होते. काम करत असतांना त्यांना कोणत्यातरी विषत्तरी द्रावणाच्या संपर्कात आल्याने विषबाधा झाल्याची घटना दि. २७ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. त्यांना कामकारांनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना दि. १ रोजी दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ सचिन पाटील हे करीत आहे.
