
जळगाव : प्रतिनिधी
१ जून या तारखेला भरपूर लोकांचे वाढदिवस असतात. त्याचे कारणही तसे खूप गमतीदार आहे. या दिवशी खरच इतके वाढदिवस असू शकतात का ? तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल. पण १ जून हा दिवस ज्या व्यक्तींना आपली जन्मदिनाक माहीत नसते. ते फक्त १ जून लिहून मोकळे होतात. त्यामुळेच हा दिवस सरकारी वाढदिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातोय. या दिवशी आपल्या आजूबाजूला अनेकांचा वाढदिवस असतोच. सोशल मीडियावर असणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या अकाउंटशी 1 जून रोजी वाढदिवस असणारे शेकडो फ्रेंडस जोडलेले असतात. अशावेळी सर्वांचे वाढदिवस एकत्र जल्लोषात साजर जातो.
तर यामागचं कारण फार काही मोठं नाही. पूर्वी जन्म-मृत्यूची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपलं मुलं कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आलंय हे अनेक आई वडिलांच्या लक्षातही नसायचं. तेव्हा आतासारखी रुग्णालयातही बाळंतपण व्हायची नाहीत त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुलं जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना १ जून ही जन्मतारीख देण्यात आली. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणं अधिक सोपं झालं. काहींचे वडील देखील नोकरी करणारे होतं. त्यामुळे बदल्याही खूप व्हायच्या. या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रं देखील हरवायची.
त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रंही सापडायची नाहीत. पुढे इतर शैक्षणिक ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. तेव्हा बिचारी ही मुलं कोणत्याही महिन्यात जन्मला का येऊ दे पण सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख मात्र १ जूनच केली जायची. त्यामुळे सगळ्यांचे वाढदिवस हे १ जूनलाच येतात.
गेल्या ४० ते ४५ वर्षा आधी नागरिकांमध्ये शिक्षणाचा कुठलाही प्रचार, प्रसार नसल्याने लोक शिक्षणापासून वंचित राहिले होते. त्यातच जे काही लोक शिक्षण घेत असत ते त्यावेळेस आर्थिकदृष्ट्या पुढारलेले असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्व समजलेले होते. तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना मात्र आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र कष्ट करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणे. महत्वाचे असल्याने ते कधी शाळेजवळ फिरकलेच नाही. त्या नंतर शासकीय योजनांचा प्रचार प्रसार होऊ लागल्याने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शैक्षणिक योजना जायला लागल्या त्यावेळेस नागरिकांमध्ये शिक्षणाचे महत्व वाढू लागले व ते नागरिक आपल्या मुला – मुलींना शाळेत पाठवू लागले. तसेच आपल्याकडे जर शाळेत प्रवेश करायचा असला तर तो जून महिन्यात होत असतो. तसेच ज्या वेळेस प्रवेश दिले जायचे तेव्हा भरपूर नागरिकांना त्यांच्या पाल्यांची जन्मदिनाक माहीत नसते ते तेथील गुरुजीना सांगायचे की तुम्हाला जी हवी आहे ती टाकून द्या. तेव्हा ते गुरुजी १ जून अशी दिनांक टाकून पाल्यांना प्रवेश देत असत जेणेकरून शिक्षणापासून वंचित राहिलेले पुढे वंचित रहायला नको म्हणून ही १ जून काही काळानंतर ‘ सरकारी वाढदिवस ‘ म्हणून साजरा होत असतो.