जळगाव मिरर । ९ जानेवारी २०२३
राज्यातील उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. उर्फी असगी कपडे का घालते? याचं कारण सांगितलं आहे. पूर्ण कपडे घातल्याने आपल्याला ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं तिने म्हटलं होतं. त्याचा उर्फीने फोटोही शेअर केला होता. मात्र, त्यावरून चित्रा वाघ यांनी उर्फीला चांगलंच फटकारलं आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या कि, आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला आहे. चित्रा वाघ यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उर्फीला डिवचलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही. फॅशन व नांगनाच यात फार फरक आहे. ऐकलं तर ठीक. नाही तर आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
एका आईने मला एसएमस पाठवला होता. त्यामुळे मी उर्फी विषयावर बोलले. मुली कोणाचा आदर्श घेणार? महाराष्ट्रात हे चालणार नाही. आधी कपडे घाला. मग ठरवा, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली आहे.
