
जळगाव मिरर | १७ जून २०२६

उकाड्यामुळे कुटुंबीय गच्चीवर झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून रोख ३७ हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना दि. ५ जून रोजी उघडकीस आली. या प्रकरणी दि. १५ जून रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील करंज येथील सागर बाळू धनगर (वय २६ हे सध्या उन्हाळ्यामुळे उकाडा होत असल्याने कुटुंबीयांसह गच्चीवर झोपलेले होते. त्या वेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातून रोख ३७ हजार रुपयांसह सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल, १२ हजाराचे झुमके, १२ हजारांचे मणी, ६ हजारांची चांदीची चेन असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
दि. ५ रोजी सकाळी हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी सागर धनगर यांनी दि. १५ जून रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहेत. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तीन चोरटे दुचाकीवर आल्याचे त्यात दिसत आहे. मात्र चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने त्यांची ओळख पटविणे शक्य होत नाही.




















