जळगाव मिरर । ३ डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील नवी पेठ परिसरात चोरटयांनी मध्यरात्रीच्या सुमारास दागिन्यांची दुकान फोडल्याची घटना ताजी असताना शहरातील जयनगर परिसरातील एका घरातून १९ लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार दि. २२ जून २०२३ रोजी घडला असून याप्रकरणी सहा जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जय नगर परिसरात सुरेखा कमलेश मारू( वय ६९ ) या वास्तव्यास असून त्यांच्या घरातून दि. २२ जून २०२३ रोजी संशयित ललित किसनचंद डेमला, नीता ललित डेमला ,हर्ष ललित ढेमला ,भावना हर्ष डेमला ,सागर सुरेश मोटवानी ,विजय रामदास गुंजाळ सर्व रा. कृष्ण सदन प्लॉट नंबर 38 जयनगर जळगाव यांनी घरातून पाच लाख दहा हजार रुपये रोख ,पाच लाखांचे विवाहात मिळालेले 50 तोळे सोने, दोन लाखांचे भांडे ,दोन लाखांचे पन्ना अंगठी ,साडेचार लाखांचे घरातील सामान, 45 हजार रुपयांचे कंपनीचे घड्याळ ,असा एकूण 19 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची फिर्याद भाडेकरी असलेल्या सुरेखा मारू यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे याबाबत मारू यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.