
येथील कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील केंद्रीय विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा 30 एप्रिल रोजी उत्साहात पार पडला.
यावेळी ‘आजादी का अमृत महोत्सव व नवरस’ या थीमवर खेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव करण्यात आला. जळगाव येथे मागील 25 वर्षापासून केंद्रीय विद्यालय या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर आहेत. सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून मिळालेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, त्यामाध्यमातून जळगाव व केंद्रीय विद्यालयाचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन संमेलनाचे मुख्य अतिथि तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांनी यावेळी केले.ह्या प्रसंगी दिवाणी न्यायाधिश श्री.श्रीनाथ फड, जळगांव जिल्हा सत्र न्यायालय श्री. गोकुल महाजन, प्राचार्य पोदार इंटरनेशनल स्कूल जळगांव डॉ की. एम. रोकडे, शिरिष अडम, विद्यालय व्यवस्थापन समिति सदस्य आदी प्रमुख मान्यवर व विविध विद्यालयाचे मुख्याध्यापकही स्नेहसमेलनास उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी कटिबध्द असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य श्री. मैथ्यू अब्राहम यांनी या प्रसंगी नमूद केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व जळगावातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. उत्कृष्ट व सुरेख तालबध्द लेझीम सादर करीत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले होते. प्रारंभी ज्ञानदायिनी सरस्वती पूजन झाले दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. स्वागतगीत स्वागत नृत्यानंतर औपचारिक स्वागत व केंद्रीय विद्यालयाचा वार्षिक आया यावेळी प्राचार्य श्री. मैथ्यू अब्राहम यांनी सादर केला. त्यात केंद्रीय विद्यालयाच्या मागील 25 वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतांना कोरोना काळात विद्यालयाच्या कार्याचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, नाटक, मुकनाटक, वक्तृत्व, गीत-गायन, योग प्रस्तुति अशा विविधांगी कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळाली. क्रीडा व कला क्षेत्रातील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी विद्यार्थीनीया गुणी करण्यात आला. या संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाच्या सूत्र-संचालनांची जबाबदारी प्रीती सोजवल, संतोष पाटील व इंद्रायणी यानी सांभाळली लेझीम पथकवोल पथक नियोजन समितीची धुरा सौ. अमिता निकम यांनी सांभाळली. सर्व उपस्थितांचे विद्यालयाच्यावतीने जी.एल. अहिरवार यानी आभार मानले. या वार्षिक बेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सौ.मिनाक्षी रा. पाटील, नितीन बारसे, एकनाथ सातव, मिथुन डिवरे, विवेक साहनी, धर्मेंद्र सिंह, मिनाक्षी मा. पाटील, पूनम खरात, शैलजा मीणा, संतोष बुनकर, पूनम जमधडे, मोहन शकोकरे, सौ. प्रणिता सोनवणे, सौ. दिपिका खडेतोड, सौ. यामिनी सावदेकर यांसोबत शिक्षकेतर कर्मचारी प्रमोद वागळे, रा. रा. सुरवाडे, ज्ञानेश्वर पाटील व विद्यार्थी स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.






















