
जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२५
राज्यातील अनेक शहरात गेल्या काही वर्षापासून बनावट जन्म दाखला देण्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता जालना येथून देखील एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. नाव बदलून बांगलादेशातील दांपत्य घुसखोरी करून भारतात आले. परंतु त्यांच्यात भांडणहोत असल्याने पतीने ११२ वर कॉल करूनतक्रार केली. यानंतर पोलिसांनी येऊनचौकशी केली असता, दोघेही बांगलादेशी असल्याचे पुढे आले. ही घटनाजालना-छत्रपती संभाजीनगर रोडवरीलएका हॉस्पिटलमध्ये उघडकीस आली आहे. बुलबुली मुस्ताफजूर रहमान नाव असलेल्या बांगलादेशी महिलेन रिया मंडल (२३) असे बनावट नाव धारण केले. ही महिला नवी मुंबईतील सानपाडा परिसरात पती असलममनी काझी याच्यासोबत राहत होती. मात्र, जालना जिल्ह्यातील एकासोबत तिचेऑनलाइन प्रेम जुळले होते. त्यामुळे बुलबुलीआपल्या प्रियकराला भेटण्यासाठीबदनापूरकडे आली होती. याची माहितीमिळाल्यानंतर तिच्या पतीने तिला जालन्यातगाठले. मात्र, भांडणामुळे दोघे पोलिसांच्याजाळ्यात अडकले.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशात गरिबीला कंटाळूनपती-पत्नीने भारतात प्रवेश केला. यानंतर हेदांपत्य मुंबईतील सानपाडा परिसरात राहतहोते. भांडण होत असल्याने महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी जालना गाठले.नंतर पतीही तिच्या मागावर असल्यानेत्यांच्यात वाद झाला. यामुळे पती असलमकाझी याने त्याच्या फोनवरून ११२ या क्रमांकडायल केला. नंतर पोलिसांनी दोघांचीहीचौकशी केली असता, ते बांगलादेशीअसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळेपोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पुढीलतपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्हीबांगलादेशींच्या कागदपत्रांची पडताळणी सुरुकेली आहे. दोन्ही कोणाच्या संपर्कात होते,कोणाच्या माध्यमातून त्यांनी भारतातघुसखोरी केली, त्यांच्याप्रमाणे आणखीकिती बांगलादेशी घुसखोर आले आहेत, याबाबींची पोलिस माहिती घेत आहेत.मुंबईतही पथक तपासासाठी जाणार आहे.
या दोघांनी भारतात घुसखोरी कशी केली,महिलेचा प्रियकर कोण आहे, याबाबतचातपास होईल, अशी माहिती पीएसआयअजय जैस्वाल यांनी दिली आहे. तीन महिन्यांपूर्वी बदनापूर पोलिसांनीयापूर्वीही एका महिलेला ताब्यात घेतले आहे.ती महिलाही इतर दोन जणांसोबतबांगलादेशातून भारतात आली होती. तीलग्नही करणार होती. त्यापूर्वीच पोलिसांनीतिला ताब्यात घेतले आहे. ही महिला सध्यान्यायालयीन कोठडीत आहे.




















