जळगाव मिरर | १५ जुलै २०२५
सहा महिन्यांपुर्वीच लग्न झालेल्या अश्विनी गणेश पाटील (वय १९, रा. लमांजन, ता. जळगाव) या विवाहितेने घरी कोणीही नसतांना गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी विवाहितेची सासू कामावरुन घरी आल्यानंतर उघडकीस आली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील लमांजन येथे अश्विनी गणेश पाटील या विवाहिता पत्नी, सासू सासऱ्यांसह वास्तव्यास होत्या. सहा महिन्यांपुर्वीच त्यांचे गावातीलच गणेश पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. सोमवारी त्यांचे पती एमआयडीसी परिसरातील कंपनीत कामाला गेले होते, तर सासू सासरे हे मजूरी कामासाठी गेले होते. त्यामुळे घरी एकट्याच असलेल्या अश्विनी पाटील या विवाहितेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. मजूरी कामावरुन विवाहितेची सासू या दुपारी घरी परतल्या. त्यांनी दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून पाहिले असता अश्विनीने गळफास घेतल्याचे दिसले. सून गळफ-ास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे ग्रामस्थांनी तात्काळ त्यांच्याघराकडे धाव घेतली.
ग्रामस्थांच्या मदतीने विवाहितेचा मृतदेह खाली उतरवून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. येथे डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. तसेच लग्नानंतर केवळ सहा महिन्यात विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
