
जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२५
देशभरातून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत असतांना आता राजस्थानमधील दौसा येथे पिकअप आणि कंटेनरच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ मुले आणि ४ महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशातील कासगंज (एटा) येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ३.३० वाजता सैंथल पोलीस स्टेशन परिसरातील बापी गावात हा अपघात झाला. पिकअपमधील सर्व लोक खाटूश्याम यांना भेटून परतत होते. सुरुवातीच्या तपासात कंटेनरने मागून पिकअपला धडक दिल्याचे समोर आले आहे. पिकअपमध्ये २२ हून अधिक भाविक होते. त्यापैकी १० जणांचा दौसा येथे मृत्यू झाला. दरम्यान, जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
या मृतांमध्ये पूर्वी (३), प्रियांका (२५), दक्षा (१२), शीला (३५), सीमा (२५), अंशु (२६) आणि सौरभ (३५) यांचा समावेश आहे. मृतांपैकी चार जणांची ओळख पटलेली नाही. काही जखमींना दौसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर गंभीर जखमींना जयपूर येथील सवाई मान सिंग (एसएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले. एसएमएसमध्ये दाखल करण्यात आलेल्यांमध्ये लक्ष्य (५), नैतीक (६), रीता (३०), नीलेश कुमारी (२२), प्रियंका (१९), सौरभ (२८), मनोज (२८) आणि आणखी एक जण आहेत.





















