महावीर क्लासेसचा उपक्रम; स्पर्धा परीक्षाभिमुख तज्ज्ञ मार्गदर्शन
जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२६
वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशासाठी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महावीर क्लासेसतर्फे केवळ एमएच-सीईटी (मेडिकल व इंजिनिअरिंग) विद्यार्थ्यांसाठी विशेष ४५ दिवसांचा उन्हाळी क्रॅश कोर्स १२ वी परीक्षेनंतर लगेच सूरी होणार आहे. विद्यार्थ्यांना अचूक व परीक्षाभिमुख मार्गदर्शन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सीबीएसई व राज्य मंडळाच्या बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा या कोर्समध्ये सहभाग असून, फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी (फार्मेसी,नीट) तसेच फिजिक्स, केमिस्ट्री व गणित (इंजिनिअरिंग) या विषयांचे सखोल अध्यापन करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून संभाव्य प्रश्नांचा सराव, महत्त्वाच्या प्रकरणांवर विशेष भर आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून संकल्पना स्पष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले जाइल.
आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. वेळेचे अचूक नियोजन, प्रश्न सोडविण्याचा वेग व अचूकता वाढविणे, आणि नियमित सराव चाचण्या या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत केली जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शंकांचे त्वरित निरसन करून वैयक्तिक प्रगतीचा आढावा घेतला जाइल
तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रवेश परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रकरणानुसार अचूक मार्गदर्शन, परीक्षेची मनातील भीती कमी व्हावी यासाठी प्रकरणनिहाय त्रिस्तरीय परीक्षांचे आयोजन, केले जाते . टप्प्याटप्प्याने परीक्षांची काठीण्य पातळी वाढवण्याचे नियोजन, संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिका करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले जाते. महावीर क्लासेसचे स्वतःचे अद्ययावत ग्रंथालय आहे. क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांना नामांकित मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. मूलभूत तयारी व पक्का पाया या बळावर अनेक विद्यार्थी देश-विदेशात उत्तुंग करिअरचे यश चाखत आहेत.
मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि दर्जेदार महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता लक्षात घेता शेवटच्या टप्प्यातील योजनाबद्ध व केंद्रित तयारी अत्यंत महत्त्वाची ठरते, नीट व एमएच-सीईटीच्या माध्यमातून उत्तम मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी हा क्रॅश कोर्स उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमाला जळगाव सह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी विलंब न करता तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




















