• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव
0
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
Share on FacebookShare on Twitter

नैसर्गिक शेतीकडे वळा – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

जळगाव मिरर | २० मार्च २०२६

“शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान आहे. रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ या राष्ट्रीय अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

देशातील शेतीजमीन सुपीक राहावी, रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा आणि शाश्वत शेतीला चालना मिळावी या उद्देशाने अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ,आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यासह विविध मान्यवर, सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पुढे सांगितले की, रासायनिक खत व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत आहे. योग्य पद्धतीने नैसर्गिक शेती केल्यास उत्पादनात घट होत नाही, उलट जमिनीची गुणवत्ता सुधारते. “धरती माता वाचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी किमान काही क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे प्रयोग करावेत, असे आवाहन केले.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आपण जमिनीला केवळ उत्पादन देणारे साधन समजतो; मात्र तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. वाढत्या रासायनिक खत व कीटकनाशकांच्या वापरामुळे अन्नातून शरीरात जाणाऱ्या रसायनांमुळे गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मातीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भारत हा जगात एकमेव देश आहे जो भूमीला ‘माता’ मानतो. मात्र, आपणच तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. रासायनिक खत व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता आणि अन्नाची गुणवत्ता धोक्यात येत असून त्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होत आहे. त्यामुळे शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील शेतीजमीन रासायनिक खतांच्या वापरामुळे निकस होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी व पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांनी सन २०२१ पासून ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ हे राष्ट्रव्यापी जनअभियान सुरू केले आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरातील सुमारे ३० हजार गावे व ५४ हजार शहरी भागांत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ अमळनेर येथे करण्यात आला.

या अभियानाचा कालावधी १९ मार्च २०२६ ते अक्षयतृतीया १९ एप्रिल २०२६ पर्यंत राहणार असून या कालावधीत देशभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी भूमी सुपोषण व संवर्धन अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘धरती माता संरक्षण’ करण्याचा संकल्प घेत अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सातपुड्याच्या पायथ्याशी गूढ मृत्यू; हरिपुरा धरणाजवळ तरुणाचा मृतदेह !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group