
जळगाव मिरर | १२ जून २०२६

देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या JEE Advanced 2026 परीक्षेत जळगावच्या जयिष्णू पेस संस्थेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे अथक मार्गदर्शन यांच्या बळावर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशामध्ये अथर्व अविनाश चव्हाण याने ऑल इंडिया रँक (AIR) 271* मिळवत जळगाव जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल केले आहे. अथर्वने JEE Advanced परीक्षेत एकूण 360 पैकी 194 गुण मिळवले. त्यामध्ये रसायनशास्त्र विषयात 78 गुण, भौतिकशास्त्रात 69 गुण आणि गणितात 47 गुणांची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
अथर्वच्या या दैदिप्यमान यशासोबतच जयिष्णू पेसच्या इतर विद्यार्थ्यांनीही राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भक्ती मकवाना हिने AIR 3559*, सारंग वाणी याने AIR 3937* तर प्रांजल चौधरी याने AIR 10167* मिळवत संस्थेच्या यशात मोलाची भर घातली आहे.
JEE Advanced ही देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. अशा स्पर्धात्मक परीक्षेत जयिष्णू पेसच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक पद्धतीचे आणि विद्यार्थीकेंद्री मार्गदर्शनाचे द्योतक मानले जात आहे.
संस्थेच्या व्यवस्थापनाने या यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना भविष्यातही विद्यार्थ्यांना सर्वोत्तम मार्गदर्शन देण्याचा संकल्प व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. जयिष्णू पेसच्या या उल्लेखनीय यशामुळे जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातील विद्यार्थ्यांसाठीही ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जयिष्णू पेसच्या संचालिका सविता वाणी व दिलीप वाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर पालकांनी जयिष्णू पेसच्या संचालकांसह शिक्षक वृंदचे आभार व्यक्त केले आहे.





















