
जळगाव मिरर | २४ जून २०२६

अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील राकेश रतिलाल पाटील (वय ३२) या तरुणाचा २३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर येथील राकेश पाटील व त्यांची आई मजूर कामाला लावलेले असल्याने ते दोघेही शेतात गेले होते. दरम्यान, २३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडाकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बाजूलाच बाजूलाच असलेल्या लिंबाच्या झाडाखाली मजूरांसह राकेशची आई व मजूर थांबलेले होते.
दरम्यान, राकेश पाटील हे आपली दुचाकी रस्त्यावर लावण्यासाठी घाईघाईने निघाले. त्याचवेळी अंगावर अचानक वीज कोसळल्याने राकेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर, आईच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने राकेशच्या आईने मोठा आक्रोश केला. राकेशच्या अंगावर पडलेल्या विजेचा फटका इतका जबर होता की, त्यांच्या अंगावरील कपडे तसेच बागायती रुमाल ही जळाल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, राकेशला तत्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मयत घोषित केले. दरम्यान, शहापूर येथे सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.




















