जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२६
दागिन्यांची दुरुस्तीसाठी आलेल्या अर्पणा वसंत चौधरी (रा. कल्याण) या महिलेची दीड लाखांचे सोने असलेली बॅग शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी रिक्षात राहून गेली होती. त्यांनी जिल्हापेठ पोलिसात येवून आपबिती कथन केली. दरम्यान, पोलिसांनी नेत्रमच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर रिक्षा चालकाचा शोध घेत सोन्याचे दागिने असलेली बॅग परत मिळवून दिल्याने महिलेने पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील अर्पणा चौधरी या शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महाबळ परिसरातील संभाजी नगर येथून बाजारपेठेत येण्यासाठी रिक्षात बसल्या. सुरुवातीला चिमुकले राम मंदिरात दर्शन घ्यायचे असल्याने त्या बस स्टॅण्ड समोरील राम मंदिरासमोर उतल्या मंदिरात गेल्यानंतर त्यांना दुरुस्तीसाठी आणलेल्या सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग दिसून आली नाही. त्यांनी बॅगेचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तरी देखील बॅग मिळून न आल्याने अखेर त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अनिल वाघ यांना सांगितला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रभारी सपोनि अनिल वाघ यांनी गुन्हे शोध पथकातील तेजस मराठे, विलास पवार आणि जयेश मोरे यांना बॅगेचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तिघ कर्मचाऱ्यांनी चिमुकले राम मंदिर परिसरातील नेत्रमच्या कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून महिलेला सोडणाऱ्या रिक्षाचा नंबर मिळवला रिक्षाच्या क्रमांकावरुन पोलिसा संशयित रिक्षा चालकाची ओळ पटवून रिक्षा चालक निलेश अधि (रा. वाघनगर) याचा शोध घेतल त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानं परिक्षाविधीन उपअधीक्षक प्रशांत दरेक सपोनि अनिल वाघ यांच्या उपस्थित पोलिसांनी सोन्याचे दागिने असलेन बॅग अर्पणा चौधरी यांच्याकडे सुप केली. दीड लाखांचे सोन्याचे दागि असलेली बॅग परत मिळाल्याने महिल पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतु केले.




















