
मुंबई : वृत्तसंस्था
सध्या देशभरात स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन आज खातेवाटप झालं तोच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे राज्याच्या सांस्कृतीक मंत्रालयाचा भार घेताच मोठा निर्णय घेतला असून यापुढे सरकारी कार्यालयात हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे निर्देश दिले आहेत. सांस्कृतीक कार्यमंत्र्यांनी वंदे मातरम् म्हणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
⏺️ राज्यातल्या शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता फोनवर हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणावे लागणार
⏺️ राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
⏺️ लवकरच याबाबतचा आदेश काढला जाणार असे म्हणाले आहेत. pic.twitter.com/HiJ7tLfCYa
— Prashant Kadam (@_prashantkadam) August 14, 2022
खातेवाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं, माहिती व जनसंपर्क विभागासह पणन, परिवहन, सामाजिक न्याय आणि विशेष सहायता असणार आहे. तर मंत्रीमंडळ विस्तारात वित्त व नियोजन आणि गृहखातं या सारखी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीसांकडे सोपविण्यात आली आहे. राधाकृष्णविखे पाटील महसूल मंत्रालयासह त्यांच्याकडे दुग्धविकास तसेच पशुसंवर्धन मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. सुधीर मुनगंटीवार वन आणि सांस्कृतीक कार्य मंत्रालयाची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयासह संसदीय कार्यमंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली आहे.




















