मुंबई : भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचे स्वप्न पाहणारे तीन तरुणांना 22 मार्चच्या रात्री ब्रिटीश सरकारने भारताच्या तीन सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्याची सर्व तयारी केली होती. प्रत्येक रात्रीप्रमाणे या रात्रीही हे तीन शूर सैनिक ही बातमी देशभर आगीच्या वणव्या सारखी पसरली होती. ती रात्र केवळ या तिन्ही वीरांच्या कुटुंबीयांसाठीच नाही, तर हजारो-लाखो मातांसाठी होती. पूर्ण देश या घटनेला अंगावर शहारा येतील असे अनुभवत होते. पण असे काही घडले की, ब्रिटीश सरकारला नियोजित वेळेच्या 11 तास आधी 23 मार्चला त्यांना फाशी द्यावी लागली. त्या दिवशी काय झाले ते जाणून घ्या.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी 1928 मध्ये लाहोर येथे ब्रिटिश कनिष्ठ पोलीस अधिकारी जॉन साँडर्स यांची गोळ्या घालून हत्या केली. भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी एक विशेष न्यायाधिकरण स्थापन केले ज्याने तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. 23 मार्च 1931 ला लाहोर सेंट्रल जेलमध्ये तिघांनाही फाशी देण्यात आली. या प्रकरणात सुखदेवलाही दोषी ठरवण्यात आले होते.
सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्याबद्दल भगतसिंग यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ही शिक्षा 24 मार्च देण्यात येणार होती. पण, हा दिवस इंग्रजांच्या मनातील भीती म्हणूनही स्मरणात ठेवला पाहिजे, ज्यामुळे या तिघांना 11 तासांपूर्वी फाशी देण्यात आली. तर दुसरीकडे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू फासावर जाताना गात होते. हे तीन देशभक्त तरुण मात्र आपले शेवचे क्षणही आनंदाने देशभक्तीचे गीत गात असताना फासावर जाण्यासाठी हसत हसत आपले बलिदान भारत मातेच्या चरणी अर्पण करण्यास सज्ज होते.
तिन्ही वीरांच्या फाशीची शिक्षा संपूर्ण देशात आगीच्या वणव्या सारखी पसरली. त्यानंतर फाशीबाबत ज्या प्रकारे निदर्शने आणि आंदोलने सुरू होती, त्यामुळे ब्रिटिश सरकार घाबरले होते. परिणामी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना नियोजित तारखेच्या एक दिवस आधी शांतपणे फाशी देण्यात आली.
भगतसिंग तुरुंगात असताना त्यांनी अनेक पुस्तके वाचली होती. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग आणि त्यांचे दोन साथीदार सुखदेव आणि राजगुरू यांना संध्याकाळी 7.33 च्या सुमारास फाशी देण्यात आली. फाशीवर जाण्यापूर्वी ते लेनिनचे चरित्र वाचत होते. जेव्हा भगतसिंग यांना तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले की त्यांची फाशीची वेळ आली आहे, तेव्हा ते म्हणाले- ‘थांबा! आधी एका क्रांतिकारकाला दुसऱ्याला भेटू तर द्याल. मग एक मिनिटानंतर पुस्तक छताकडे झेपावले आणि म्हणाले, ‘ठीक आहे आता जाऊया’.
भगतसिंग कसे होते
भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला. हा दिवस सामान्य नव्हता, तर भारतीय इतिहासातील एक अभिमानास्पद दिवस म्हणून ओळखला जातो. अखंड भारताच्या भूमीवर एक असा माणूस जन्मला ज्याचा जन्म बहुधा इतिहास लिहिण्यासाठी झाला असावा. क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म लायलपूर (आता पाकिस्तानात) जिल्ह्यातील बाओली गावात एका सामान्य कुटुंबात झाला. भगतसिंग जेव्हा जाणवले की आपलं स्वातंत्र्य घराच्या भिंतीपुरते मर्यादित आहे, तेव्हा त्यांना वाईट वाटले. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर मागण्याऐवजी लढावे लागेल, असे ते वारंवार सांगत राहिले. य तीन तरुणाचे बलिदान भारत कधीच विसरू शकत नाही
