वरणगाव : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील दिवसभर सोबत राहणारे दोघे मित्र दारू पिऊन विहीरीच्या काठावर बसून गप्पा मारताना त्यांच्यात शब्दीक खटका उडाला. त्यानंतर एकाने दुसऱ्याला चापटा बुक्के मारीत सरळ विहिरीत ढकलून दिले. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची घटना उघडकीस आली आसून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत वरणगाव पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील जाडगाव येथे दि ८ सोमवार रोजी गावातील पंचायती विहिरात पडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सुरुवातीस पोलीस स्टेशनला अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोहेकॉ मधुकर भालशंकर व योगेश पाटील हे तपास करीत असताना वेगळीच माहीती समोर आली आहे.
गावातील गोंविदा संतोष पाटील ( ३५ ) व राजु युवराज सोनवणे ( ३२) हे दोघे मित्र कित्येक दिवसापासून सोबत राहून काम करीत असायाचे. दि ८ सोमवार रोजी दुपारच्या वेळेस दोघानी सोबत दारू पिऊन गावातील पंचायती विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारत बसले होते. यावेळी दोघांमध्ये शब्दीक खटके उडाले. यानंतर गोविंदाला राजूने चपाटा बुक्याने मारून विहिरीत लोटून दिल्याने गोविदाचा पाण्यात पडून अंत झाला होता. याबाबत सुरुवातीस वरणगाव पोलीस स्टेशला संतोष जगदेव पाटील यांच्या खबरीवरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलीसांना या घटनेची शंका असल्याने या घटनेचा बारकाईने तपास करून उलगडा सोडविला. या बाबत मयताचे वडील संतोष पाटील यांच्या फिर्यादीनुसार राजु सोनवणे यांस अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात भादवी कलम ३०४ , ३२३ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सपोनि आशिष आडसुड हे करीत आहेत